फुले शिकवतात...... गुलाब सांगतो,येता जाता रडायचं नसतं,काट्यात सुध्दा हसायचं असतं;रात राणी म्हणते,अंधाराला घाबरायचं नसतं,काळोखात ही फुलायचं असतं; सदाफुली सांगते,रुसुन रुसुन रहायचंनसतं,हसुन हसुन हसायचं असतं; बकुळी म्हणते,सावळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं; मोगरा म्हणतो,स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,सदगुणा॑चा सुगंध मैलवरुन ही येतो; कमळ म्हणतो,संकटाच्या चिखलात बुडायचं नसतं,संकटांना बुडवुन फुलायचं असतं
0 comments:
Post a Comment